
कराड ः शामगाव येथील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्याने वाळत चालली आहेत. बोबांळवाडी तलावामधून शामगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या पाइपलाइन द्वारे दिडशे ते दोनशे एकर क्षेत्र ओलिता खाली येत असते. परंतु टेंभू योजनेचे पाणी बोबळवाडी तलावात सोडले नसल्याने हा तलाव आटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला गेले महीना भर पाणी देता आले नाही तसेच शामगावच्या पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न गंभीर झाला आहे.
आज शामगाव ग्रामस्थ व रयत क्रांति संघटनेच्या वतीने टेंभू धरण व सिंचन व्यवस्थपन विभाग ओगलेवाडी यांना निवेदन देवून येत्या तीन चार दिवसात पाणी सोडावे अशी मागणी केली.
यावेळी टेंभूचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार व अभियंता नलवडे यांनी येत्या चार दिवसात पाणी सोडण्याचे मान्य केले. तसेच यावेळी सर्व शेतकऱ्यांनी टेंभू व्यवस्थापनाच्या सूचने नुसार पाणी मागणी अर्ज केला.
शामगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन महिन्या पूर्वी टेंभू योजनेचे पाणी शामगावला पाईपलाइनद्वारे कायम स्वरूपी मिळावे यासाठी पाच दिवस शामगाव येथे उपोषण केले होते. भविष्यात या योजनेला मंजूरी मिळून पाणीही मिळेल पण आता ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुण बोबांळवाडी तलावातून पाइपलाइन केली आहे त्यांची पिके पाणी विणा वाळत चालली आहेत.
यावेळी टेंभूचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार व अभियंता नलवडे यांनी येत्या चार दिवसात पाणी सोडण्याचे मान्य केले. तसेच यावेळी सर्व शेतकऱ्यांनी टेंभू व्यवस्थापनाच्या सूचने नुसार पाणी मागणी अर्ज केला.
शामगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन महिन्या पूर्वी टेंभू योजनेचे पाणी शामगावला पाईपलाइनद्वारे कायम स्वरूपी मिळावे यासाठी पाच दिवस शामगाव येथे उपोषण केले होते. भविष्यात या योजनेला मंजूरी मिळून पाणीही मिळेल पण आता ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुण बोबांळवाडी तलावातून पाइपलाइन केली आहे त्यांची पिके पाणी विणा वाळत चालली आहेत.