
कराड : बाबरमाची, किल्ले सदाशिवगड (ता.कराड) येथील बिएलओ बाजीराव मंडले हे गावात राजकीय हेतूने काम करीत असुन ठरावीक मतदारांची नावे परस्पर कमी करूण त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा बिलओवर कडक कारवाई, करावी तसेच त्यांनी परस्पर कमी केलेली नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावीत. अन्यथा येणाऱ्या निवडणुकांवर सामुहीक बहिष्कार टाकण्याचा ईशारा बाबरमाची ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांतअधिकारी अतुल म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, निवडणुक विभागाचे नायब तहसिलदार युवराज पाटील, सुरेश पाटील, अधिक पाटील, संपतराव पाटील, भास्कर पाटील, अनिल पोळ, माणसिंग मुळीक, प्रविण जाधव, शंकर खोचरे, सचिन कदम, सुरेश खोचरे, राजाराम जगताप, प्रकाश बजुकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, 18 वर्षे पुर्ण झालेल्या प्रत्येक युवा व नागरीकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी मोठयाप्रमाणात जनजागृती व शिबिरे आयोजीत करण्यात येत आहेत. असे असताना बाबरमाची गावचे बिएलओ बाजीराव मंडले मात्र राजकीय हेतूने काम करीत आहते. गावातील ठरावीक मतदारांची नावे त्यांनी परस्पर कमी केली आहेत. तर 18 वर्षे पुर्ण झालेल्या नविन मतदार नोंदणीसाठी दिलेली कागदपत्रे गहाळ करूण त्यांची नावे जाणीवपुर्वक मतदार यादीत येऊ दिली नाहीत. त्यामुळे अनेक मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा राजकीय हेतूने काम करणाऱया बिएलओवर कडक कारवाई करावी, तसेच परस्पर वगळलेली नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावीत अन्यथा येणाऱया सर्व निवडणुकांवर सामुहीक बहिष्कार टाकण्याचा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी, शुभम माने, अक्षय पाटील, विशाल कुंभार, अजय घोरपडे, रणजीत पाटील, अमोल पाटील, मुकुंद वाघमारे, राजेंद्र वाघमारे, गजानन घोरपडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
वय पुर्ण असणाऱ्या सर्व नागरीकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक विभाग 100 टक्के मतदार नोंदणीचे उद्धीष्ट घेऊन काम करीत आहे. बाबरमाची गावातील परस्पर वगळलेल्या मतदारांच्या नावाची यादी द्यावी ती नावे पुन्हा ऑनलाईन नोंद करण्यात येतील. तसेच त्यांना येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल. बाबरमाचीतील मतदार यादीतुन वगळलेल्या नावांची चौकशी करून दोषी आढळणारांविरोधात कारवाई करण्याचे अश्वासन अतुल म्हेत्रे यांनी दिले.
बाबरमाची ग्रामपंचायत कार्यकारणीची मुदत संपली असुन येत्या काळात गावची पंचवार्षीक निवडणुक होणार आहे. त्यामुळे मतदार यादीतील वगळलेल्या नावांचा मुद्या महत्वाचा असल्याची प्रतिक्रीया माजी सदस्य अधिक पाटील यांनी दिली.