ताज्या बातम्याराजकियराज्य

‘अन्यथा १ वर्षाच्या आत राजकीय संन्यास घेईल.’; शहाजीबापू पाटलांचं गावकऱ्यांसमोर मोठं विधान

सांगोला : राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. यानिमित्त महायुतीच्या नेत्यांकडून जल्लोष देखील करण्यात आला. मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला आहे.

शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख 25 हजार 384 मतांनी विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना पुन्हा उमेदवारी सांगोला विधानसभा मतदारसंघात पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दीपक साळुंखे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख रिंगणात उतरले होते. अखेर येथून शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा विजय झाला आहे.

मात्र, आता पराभवानंतर शहाजी बापू पाटील हे पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. ते सक्रिय झाले आहेत. त्यांनी भेटीगाठीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूर परिसरात या पराभवाचे चिंतन आणि मंथन करण्यात येत आहे. यावेळी एका ठिकाणी जनतेशी संवाद साधताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे आश्वासन दिले.

निवडणूकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या 14 गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय संन्यास घेईल, असे मोठे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. पराभव झाल्यानंतर सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांनी चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

ही निवडणूक भावनिक मुद्यावर गेली होती, दोन वर्षात 5 हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहित आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दीपक आबा यांना आणि देशमुख यांना खडेबोल सुनावले. सूडाचे राजकारण मी केले नाही करत नाही…शहाजीबापू निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार नेता नाही. एकनाथ शिंदे, फडणवीस साहेबांकडून असं पद घेऊन येतो, असे ते म्हणाले. यामुळे शहाजीबापूंना पराभवानंतर पण मोठे पद मिळणार आहे, याची चर्चा होत आहे.

सांगोला हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता. गणपतराव देशमुख या मतदारसंघातून 11 वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. खुद्द शहाजीबापुंनी देशमुखांविरोधात 6 वेळा निवडणूक लढविली होती. पण तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 ला बाबासाहेब देशमुख यांची वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे शहाजीबापू पाटील यांना संधी चालून आली होती. 2019 च्या निवडणुकीत शहाजी पाटलांचा विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांनी 1 लाख 16 हजार 280 मते घेत शहाजी बापू पाटील यांचा 25 हजार 384 मतांनी पराभव केला. बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा सांगोला मतदारसंघ खेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close