ताज्या बातम्याराजकियराज्य

वादग्रस्त विधान करणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुख्यमंत्र्यांकडून चांगलीच खरडपट्टी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना तथा बदलापूरच्या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत असल्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांवर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी वादग्रस्त विधान करणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यात सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे केवळ कारवाईच्या घोषणा नको, थेट कृती करा, अशा शब्दांत शिंदे यांनी दीपक केसरकर यांना समज दिल्याचे आज पुढे आले आहे.

विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारची राज्यभर चांगली प्रतिमा निर्मिती होत असताना या दोन्ही घटना घडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले.

त्यामुळे त्यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना चांगलेच खडेबोल सुनावले. शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा, असे शिंदे यावेळी केसरकर यांना उद्देशून म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे. त्यामुळे नागरिकांनी या पद्धतीने याकडे बघावं, कदाचिक वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्यातून ही घटना घडली असेल, हा अपघात नेमका कसा घडला. याचा तपास सुरू आहे. या

त जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई सुद्धा होईल. पण कारवाई केल्याने जखम भरून येत नाही. जखमा भरून यायच्या असतील, तर अतिशय भव्य पुतळा याठिकाणी उभा करावा लागेल. महाराजांसाठी तीच खरी आदरांजली ठरेल” असे दीपक केसरकार म्हणाले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close