
कराड : यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा प्रारंभ कारखान्याच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात करण्यात आला.
यावेळी फायनान्स मॅनेजर जयेंद्र नाईक, मुख्य शेती अधिकारी व्ही. बी. चव्हाण, डे. शेती अधिकारी नितीन साळुंखे, इ. डी.पी.मॅनेजर प्रकाश सोनवणे, चीफ अकाउंटंट बी. जे. कुंभार, एम. के. साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील गळीत हंगामात सर्व ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांनी विशेष सहकार्य करून गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडला. कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब पाटील, संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सभासद शेतकरी यांच्या सहकार्यामुळे कारखान्याच्या विस्तारवाढीचे काम पुर्णत्वास गेले असून, ऊसाची प्रतिदिन गाळप क्षमता वाढणार आहे, त्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यंत्रणेचे नियोजन करण्यात येणार असून, जास्तीत जास्त ऊसाचे गळीत केले जाईल, असे सांगून सर्व ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य शेती अधिकारी व्ही.बी.चव्हाण यांनी केले
याप्रसंगी गजानन देशमुख, अशोक चव्हाण, ताजुद्दीन मुल्ला, मनोहर चव्हाण, हणमंत पाटील, विश्वास थोरात, जयवंत घाडगे, नितीन कदम, तुकाराम गायकवाड, समाधान गोळे, लक्ष्मण उपासे, तानाजी सुर्वे, प्रताप काळभोर, सूरज घार्गे, वनराज जाधव, पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र इंगळे, सदाशिव पवार, दीपक मोहिते, विकास साळुंखे दयानंद सरगर उपस्थित होते.