राज्यसातारासामाजिक

महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीचा कराड पालिका प्रशासनास विसर

कराड ः कराड येथील बुधवार पेठ येथे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळ आहे. आज मंगळवार दि. 28 नोव्हेंबर रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथी निमित्त ठीक-ठिकाणी महात्मा फुले यांना अभिवादन केले जाते. मात्र कराड शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा कराड नगरपालिका प्रशासनाला विसर पडलेला आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्याला घातलेला हार अजूनही तसाच त्यांच्या गळ्यामध्ये आहे. तसेच पुतळ्याच्या आजूबाजूला गवत वाढलेले असून त्याठिकाणी कचराही पडला आहे. त्याठिकाणाची साफ-सफाई स्वच्छता नगरपालिकेने केलेली नाही. नगरपालिका प्रशासनाने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले असून, याबाबत नागरिकांमधून नगरपालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अशे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. साताऱ्यातील कटगुण या गावी 11 एप्रिल 1827 रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. आधुनिक भारतातील समाज सुधारक ज्यांनी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला, समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगितले,

ज्योतिबांनी अनेक ग्रंथांचे लिखाण सुद्धा केलेले आहे, शेतकऱ्याचा असूड, ब्राम्हणांचे कसब, अश्या अनेक प्रकारच्या ग्रंथांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले होते, “प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.“ असे म्हणणाऱ्या ज्योतीबांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणीही त्यांनी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close