ताज्या बातम्याराजकियराज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा समाजाची दिशाभूल : जितेंद्र आव्हाड

मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारने सगसोयरे या शब्दासह अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चाने नवी मुंबईतून परतीची वाट धरली.

तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याहस्ते जरांगे यांनी नवा अध्यादेश स्वीकारला, त्यावेळी मराठा समाजबांधवांनी जल्लोष केला. आता, यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरंच, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला का, असेही अनेकजण विचारत आहेत. त्यातच, आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाला खरंच यश मिळाले आहे का, मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तर, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होईल का, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचं ट्विटरवरुन म्हटलं आहे.

“ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही..!” – देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे. कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याचा किंवा काढण्याचा अधिकार हा १०२ व्यां घटनादुरुस्ती नंतर केंद्राकडे आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. तसेच, जरांगे पाटलांना जे आरक्षण देण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे तो नेमका कशाच्या आधारावर दिला आहे..? राज्य सरकार तर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही.मग शिंदे नेमक्या कशाच्या आधारावर हा शब्द सबंध मराठा समाजाला देत आहेत..?, असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close