ताज्या बातम्याराजकियराज्य

जे भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत : मनोज जरांगे पाटील

जालना : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबद्दल वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असंच संभाजी भिडे यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जातोय. संभाजी भिडे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. त्यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. संभाजी भिडे यांच्या भूमिकेवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला.

“लय बेस्ट. वाघ मागत नसतो. शिकार करून घेत असतो. त्यांना बोलून काही उपयोग नाही. त्यांना दोष देऊन सुद्धा उपयोग नाही. त्यांची चूक असण्याचे कारण ही नाही. जे भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. आता भिडे गुरुजी तसं म्हणत असतील तर त्यांच्यापासूनही मराठे दूर जातील आणि हे देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

“देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना-ज्यांना बोलायला लावले तर त्यांच्यापासून मराठा समाज दूर गेला आणि भिडे गुरुजींसोबत ही मराठ्यांची पोरं आहेत आणि ते आता लांब जातील. देवेंद्र फडणवीस म्हणजे स्वतःला संपवायला लागला आणि त्यांचे नेतेही संपवत आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि हा फडणवीस यांचा सहावा ते सातवा डाव आहे”, असा आरोपदेखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.

“मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close