
मुंबई : वांग मराठवाडी, उत्तर मांड मध्यम आणि तारळी या प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यादृष्टीने पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आवश्यक सूचना यावेळी दिल्या. त्यास मदत व पुनर्वसन मंत्री मा. अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही दिली.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीत वांग मराठवाडी मध्यम प्रकल्प, उत्तर मांड मध्यम आणि तारळी प्रकल्पामधील बाधित प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वांग मराठवाडी मध्यम प्रकल्पातंर्गत अंशत: बाधित मौजे जिंती व निगडे या पाटण तालुक्यातील गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीबाबतचा प्रस्ताव, तसेच उत्तरमांड मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधित झालेल्या माथनेवाडी येथील ४६ कुटुंबांच्या आणि सावरघर येथील २९ कुटुंबांच्या पुर्नवसनाबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी बैठकीत आग्रही भूमिका मांडली. एकही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाविना राहू नये, तसेच पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी, यादृष्टीने पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी आवश्यक त्या सूचना दिल्या. त्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी मदत व पुनर्वसन मंत्री मा. अनिल पाटील यांनी ग्वाही दिली.
यावेळी मुख्य अभियंता डॉ. ह. तु. धुमाळ, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, पुणे विभागाच्या उपायुक्त (पुनर्वसन) पूनम मेहता, साताऱ्याचे अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राहुल धनवट यांसह वांग मराठवाडी आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्प येथील ग्रामस्थ उपस्थित होते.